Farmer Loan Waiver | 30 जून उजाडला; कर्जमाफीचा पत्ता नाही, फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली- संग्राम देशमुख  - Rayat Samachar३० जूनपर्यंत कर्जमाफी नाही; फडणवीस सरकारवर संभाजी ब्रिगेडचा हल्लाबोल

Farmer Loan Waiver | 30 जून उजाडला; कर्जमाफीचा पत्ता नाही, फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली- संग्राम देशमुख 

सरकार शेतकरी प्रश्नावर पूर्णपणे अपयशी; दिलेले आश्वासन पाळण्यात अपयश,संभाजी ब्रिगेडची टीका

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
कर्जमाफीच्या मुद्यावर राज्य सरकारवर टीका करताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुखSubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | ३० जून | रयत समाचार

(Farmer Loan Waiver) राज्य सरकारने ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आज ३० जून संपत आला तरी कर्जमाफीबाबत कोणतीही ठोस घोषणा किंवा अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडच्या शेतकरी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांनी केला.

(Farmer Loan Waiver) सामाजिक माध्यमावर प्रतिक्रिया देताना देशमुख यांनी म्हटले, राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून कर्जमाफीची मोठी अपेक्षा होती. मात्र सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण न करता शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार सपशेल अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली.

Farmer Loan Waiver शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारवर टीका करणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख
संग्राम देशमुख. शेतकरी आघाडी, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र 
(Farmer Loan Waiver) सरकारने तातडीने संपूर्ण कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करत त्यांनी सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading