अहमदनगर |०९.१० |रयत समाचार
(Politics) शहरातील कापड व्यापारी संघाचा ७५ वा अमृत महोत्सवी स्थापना दिवस कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यास आ. संग्राम जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आमदार जगताप यांनी शहराच्या बाजारपेठेच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची ‘आठवण’ करून दिली. त्यांनी आनंदधाम चौपाटीचे स्थलांतर करून परिसराचे पावित्र्य राखले तसेच लहान व्यापाऱ्यांच्या रोजंदारीचा प्रश्न समन्वयाने सोडविला.