सोनई | २१.६ | विजय खंडागळे
नेवासा तालुक्याच्या सहकार चळवळीतील महत्त्वाचा आधारस्तंभ आणि परिसरातील शेतकऱ्यांची ‘कामधेनू’ म्हणून ओळख असलेल्या मुळा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी कांगोणी येथील सोपान विठ्ठल वीरकर यांची एकमताने बिनविरोध (Mula Director) निवड झाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले. सहकारक्षेत्रात एकमताने झालेल्या या निवडीचे सभासद आणि शेतकरीवर्गाकडून स्वागत करण्यात येत असून, वीरकर यांच्यावर विविधस्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मुळा सहकारी साखर कारखाना हा अहिल्यानगरमधील नेवासा तालुक्यासह परिसरातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनाशी निगडित असलेला महत्त्वाचा सहकारी उद्योग आहे. कारखान्याच्या संचालक मंडळावर कार्य करण्याची संधी ही केवळ (Mula Director) पदाची प्रतिष्ठा नसून शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी मानली जाते. अशा परिस्थितीत सोपान वीरकर यांची बिनविरोध निवड ही त्यांच्या कार्यपद्धतीवर, लोकसंपर्कावर आणि सहकार क्षेत्रातील विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब करणारी मानली जात आहे.
(Mula Director) निवडीनंतर वीरकर यांचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुळा बँकेच्या संचालिका पुष्पाताई कराळे, सरपंच सोमनाथ कराळे, सेवा सोसायटीचे अध्यक्ष सुनील रौदळ, संचालक रामभाऊ कराळे, माजी अध्यक्ष दुर्योधन सोनवणे, संचालक पोपट रौदळ, सुभाष भालेकर, मच्छिंद्र कर्डीले, सामाजिक कार्यकर्ते कचरू बोरुडे, अविनाश कराळे, एडके तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी वीरकर यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी सोपान वीरकर म्हणाले, माजी मंत्री शंकररावजी गडाख यांच्या विचारसरणीतून प्रेरणा घेत कारखान्याच्या प्रगतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने काम करणार आहे. सभासदांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. कारखान्याच्या विकासाबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांचे हित जपण्याचा प्रयत्न राहील.
हे ही पहा : RSYT : अडीच हजार वर्षांपूर्वी विटांवर कोरलेल्या ‘सिंह सेनापती’ कादंबरीचा मराठी अनुवाद
मुळा सहकारी साखर कारखाना हा केवळ ऊस गाळप करणारा उद्योग नसून परिसरातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे केंद्र म्हणून ओळखला जातो. हजारो शेतकरी, कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या आर्थिक घडामोडींमध्ये या कारखान्याची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे संचालक मंडळातील प्रत्येक सदस्याकडून विकासाभिमुख निर्णयांची अपेक्षा व्यक्त केली जाते.
वीरकर यांच्या बिनविरोध निवडीमुळे कांगोणी गावासह परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सहकारक्षेत्रात एकमताची परंपरा कायम ठेवत कारखान्याच्या भविष्यातील वाटचालीला गती मिळेल, अशी अपेक्षा सभासदांनी व्यक्त केली.
आगामी काळात कारखान्याची आर्थिक प्रगती, शेतकरी हिताचे निर्णय, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सहकार चळवळीची मूल्ये जपत विकासाची नवी दिशा देण्याची जबाबदारी नव्या संचालक मंडळावर असणार आहे.
Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



