चित्तूर | ८ जानेवारी | प्रतिनिधी
(india news) आंध्र प्रदेश राज्याच्या दक्षिण टोकावर चित्तूर जिल्ह्यात असलेल्या तिरूपती या शहरातील बालाजी मंदिरात दर्शनासाठी टोकन घेताना प्रचंड गर्दी उसळली. त्यामधे चेंगराचेंगरीत ५ जणांचा मृत्यू झाला तर दीडशेहून अधिक जखमी झाले. शुक्रवारी असलेल्या एकादशी दिवशीच्या दर्शनासाठी आज बुधवारी सायंकाळी गर्दी उसळली होती.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा