india news

india news | …जर वेळीच उपाययोजना केली नाही तर, लोक उपासमारीने अन्न पाण्यावाचुन मरू शकतात – डॉ. सुनील गंधे; प्रयागराजमध्ये अडकले अहिल्यानगरमधील भाविक

प्रयागराज, कुंभमेळा | ३० जानेवारी | प्रतिनिधी

(india news) येथील जिल्हाभरातील अनेक भाविक प्रयागराज कुंभमेळा रस्त्यावर अडकले आहेत. गेले १२ / १३ तास अन्नपाण्याविणा त्यांची तडफड सुरू असून जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी तेथील स्थानिक प्रशासनासोबत संपर्क करून दिलासा द्यावा, अशी मागणी भाविकांनी केली आहे़. रयत समाचार प्रतिनिधी यांना प्रयागराज येथे गेलेले जखणगावचे सरपंच डॉ. सुनिल गंधे यांनी संपर्क साधून ही माहिती दिली तसेच तेथील गंभीर परिस्थितीचे व्हिडीओ व फोटो पाठविले.india news

(india news) तेथील परिस्थितीची माहिती देताना गंधे म्हणाले, जवळपास पाच किलोमीटरपर्यंत कुठेही पाणी अन्नाची व्यवस्था नाही. लाखो भाविकांची उपासमार सुरू असून यांना मदतीची विशेषता अन्नपाण्याची नितांत गरज आहे. कदाचित दोन दिवस एकाच ठिकाणी अडकून पडण्याची भाविकांवर वेळ येवू शकते. मौनी अमावस्येच्या पर्वावर दहा कोटी लोकांनी शाहीस्नानाचा आनंद घेतला परंतु एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांची व्यवस्था करण्यास उत्तरप्रदेश प्रशासनाकडून योग्य ती तयारी केल्याचे दिसून आले नाही. साध्या पार्किंग व्यवस्थेमध्येसुद्धा अस्ताव्यस्तपणा व अनियमितता दिसून आली. परिणामी रात्री बारा वाजल्यापासून आतापर्यंत आपणाला पाठवलेल्या आमच्या करंट लोकेशनवर आमची गाडी उभी आहे. दुर्दैवाने या परिसरात कुठल्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंट किंवा छोटी टपरी किंवा साधी पाण्याची व्यवस्था नाही. सुमारे एक लाखापेक्षा जास्त पब्लिक या लोकेशनवर ट्रॅफिक जाममध्ये आपल्या गाडीत बसून आहे.

(india news) ते पुढे म्हणाले, कोणी सहकार्य करण्यापेक्षा संधीचे सोने करून पाण्याची बाटली पन्नास रुपयाला व छोटे-छोट्या गोष्टी भाविकांची लूट करत आहेत. माझी आपल्या मार्फत प्रशासनाला आणि सरकारला विनंती आहे, किमान या सर्व पार्किंगमध्ये अडकलेले जे भाविक आहेत यांच्या जेवणाची आणि किमान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. ही बाब गंभीर असून तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. तरी आपण पत्रकार या नात्याने हा विषय संबंधितांपर्यंत त्वरित पोचवावा. आमचे लोकेशन टाकलेले आहे. संपूर्ण उत्तरप्रदेशमधे सर्वत्र टोलनाके सुरू असून अहिल्यानगर ते प्रयागपर्यंत एका लक्झरी बसचे ११ हजार रूपये एका बाजूच्या प्रवासाचा टोल भरला.

वाहतूक कोंडीमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या. ज्या ठिकाणी गाड्यांचे पार्किंग केले तेथे कोणीही स्वयंसेवक, होमगार्ड, पोलीस किंवा कुठलीही यंत्रणा कार्यरत नव्हती. नवीन बायपासचे काम ‘चालू’ असलेल्या वेगवेगळ्या मातीच्या ढिगार्‍यावर सपाट करून चार-चार, पाच-पाच किलोमीटरच्या रांगेत गाड्या उभ्या करण्यात आल्या. ज्यावेळेस गाडी येऊन उभे राहायची त्याला नंतर काय करायचे याच्या सूचना कोणी दिल्या नाही. त्यामुळे हजारो गाड्यांची लाईन एका नवीन काम चालू असलेल्या हायवेवर अशा ५०/५० रांगा होत्या. ज्यावेळी भाविक कुंभमेळा शाही स्नान करून परत आले, त्यांच्या गाडीत बसले तेव्हा ड्रायव्हरने मूळ समस्येचा उलगडा केला. इथे कोणी प्रशासक आला नाही, तेव्हा आमच्या गाडीला हलवण्यासाठी काही संधी मिळाली नाही. तिथून पुढे प्रत्येकाचे ड्रायव्हर येईपर्यंत जाम तसेच होते. माझी गाडी आधी की तुझी गाडी आधी या गोंधळात गाड्यांचे अजून ट्रॅफिकजाम झाले. भक्तांचेसुध्दा गाडी काढण्यावरून भांडण झाले की तुमची गाडी काढायची आमची गाडी काढायची. काही ठिकाणी काचा फुटल्या. काही ठिकाणी एकमेकाला धक्के लागले. याची जाणीव प्रशासनाला करून दिली परंतु गर्दी आणि प्रशासकीय यंत्रणेचा ताण या गोष्टींमध्ये असणारा असा काही निर्णय करण्यात आल्याच आम्हाला समजले नाही. मग आम्ही आमच्याच गाडीतील चाळीस-पन्नास स्वयंसेवक त्यामध्ये आरोग्यग्राम जखणगावचे २५, आदर्शगाव हिवरेबाजारचे ७/८ स्वयंसेवक त्याचप्रमाणे हिंगणगाव, हमीदपुर, टाकळी, अकोले, अहिल्यानगरमधील सुमारे ५० स्वयंसेवकांनी स्वतः झाडाच्या काठ्या काढून आणल्या व संघटना स्थापन केली. ट्रॅफिक कंट्रोलरचे काम केले. ज्यामुळे हजारो गाड्या त्या परिसरातून ट्रॅफिक जाममधून बाहेर काढण्यात यश आले. पुढे अशा दोन हजार गाड्या निघाल्यानंतर आम्ही पुढील व्यवस्था उरलेल्या गाड्यांच्या भक्तांकडे देऊन रात्री आठच्या सुमारास तिथून निघालो.

डॉ. सुनील गंधे यांनी अत्यंत गंभीरपणे सांगितले की, जर वेळीच उपाययोजना केली नाही तर, लोक उपासमारीने अन्नपाण्यावाचुन मरू शकतात.

आरोग्यग्राम जखणगांव येथील स्वयंसेवकांनी ट्रॅफिकजाममध्ये अडकलेल्या भाविकांना गाडीतच आरोग्यसेवा पुरवली. अनेक रुग्णांवर मोफत उपचार केले. एकाच जागेवर २४ तास मोकळे घालविण्यापेक्षा मोफत आरोग्यसेवा पुरवून वेळ व संधीचा सदुपयोग केला.

हे ही वाचा : Religion: गोरक्षनाथ मराठी होते काय ? – टी. एन. परदेशी

india news

India news: 24 जानेवारीपासून पुण्यात ‘निरंकारी संत’ समागमात मानवतेचा महासंगम

अहमदनगर | २१ जानेवारी | प्रतिनिधी

(india news) महाराष्ट्राचा ५८ वा वार्षिक निरंकारी संत समागम पिंपरी, पुणे येथील मिलीटरी डेरी फार्मच्या सुमारे ४०० एकरहून अधिक विशाल मैदानावर शुक्रवारी ता.२४ जानेवारीपासून तीन दिवसीय संत समागमाचे आयोजन करण्यात आले असून यात देशभरातील लाखो भक्तगण तसेच विदेशातील अनेक ठिकाणाहूनही मोठ्या संख्येने भाविक येणार असून आहेत. अहमदनगर क्षेत्रामधील सहा जिल्ह्यातील अंदाजे दहा हजारहून अधिक भाविक भक्तगण बुधवार पासून समागमासाठी रवाना होणार असल्याची माहिती मंडळाचे नगर क्षेत्र प्रमुख हरीश खूबचंदानी यांनी दिली.

    (india news) अधिक माहिती देताना खूबचंदानी म्हणाले, समागमाच्या पहिल्या दिवशी सकाळी सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज व राजपिता रमितजी यांना सुसज्जित वाहन (रथामधून) शोभायात्राद्वारे मुख्य सत्संग पंडालपर्यंत आणले जाईल. यावेळी अनेकतेतून एकतेचे विहंगम दृश्य पाहण्यास मिळेल. यात देशाच्या कानाकोपऱ्यातून पारंपारिक वेशभूषा धारण केलेले भक्तगण आपली कला सदगुरू समक्ष सादर करतील. सत्संगाचा मुख्य कार्यक्रम तिन्ही दिवशी दुपारी दोन वाजता सुरू होईल. ज्यात अनेक वक्ते, गीतकार, कवीजन, सद्गुरु आणि ईश्वराप्रति आपल्या मनातील भावना व्यक्त करतील. तिन्ही दिवस सत्राच्या शेवटी रात्री नऊ वाजता सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांचे ‘अमृततुल्य’, मार्गदर्शनपर प्रवचन होईल.

 दरम्यान समागमच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात निरंकारी सेवादलाच्या महिला व पुरुष सदस्यांची भव्य रॅली होईल. सेवादल कवायती व सेवेप्रति नाटिका सादर करून सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त करतील. समागमाच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळच्या सत्रात बहुभाषिक कवी संमेलन पार पडेल.india news
(india news ) मागील एक महिन्यापासून महाराष्ट्रासह इतर राज्यातून निरंकारी भावीक भक्तगण तसेच सेवादल सदस्य आपल्या निष्काम सेवांच्या माध्यमातून समागमस्थळांना समतल व सुंदर बनविण्यासाठी त्यामधील प्रत्येक व्यवस्थेला अंतिम रूप देत समागम स्थळाला एक सुंदर नगरीच्या रूपात परिवर्तित केले आहे. समागमात सहभागी होणाऱ्या सर्व भक्तगणांसाठी व्यापकस्तरावर निवासी तंबू, लंगर, कॅन्टीन, दवाखाने, सुरक्षा व्यवस्था, पाणी, अत्यावश्यक सुविधांची यथोचित व्यवस्था करण्यात आली. प्रकाशन स्टॉल्स, मुख्य आकर्षण असलेली ‘निरंकारी प्रदर्शनी’, ‘बाल प्रदर्शनी’ तयार केली आहेत.
    निरंकारी मिशनच्या वतीने मानवतेच्या या महामेळाव्यासाठी समस्त भाविक बंधू भगिनींना आदरपूर्वक आमंत्रित करण्यात येत आहे. संत समागमात सहभागी होऊन आपले जीवन सार्थक करावे, असे मिशनच्या वतीने कळविले आहे.

 

ही वाचा : Religion: गोरक्षनाथ मराठी होते काय ? – टी. एन. परदेशी

india news

india news: हिंदूंनी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नदीतील मासे खावेत की नाही? सत्येंद्र पीएस संपादित सनातन धर्माचा आयुर्वेद मांसाहार संदर्भ असलेला 1 ‘औषधी ग्रंथ’ : मांसौषधि

ग्रंथपरिचय

दरभंगा, बिहार | १५ जानेवारी | प्रतिनिधी

(india news) हिंदूंनी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नदीतील मासे खावेत की नाही? असा प्रश्न अनेकजण विचारतात. सनातन धर्माचा मांसौषधि हा ‘औषध ग्रंथ’ हे स्पष्टपणे स्पष्ट करतो. गोंधळ नाही… हे तपशीलवार समजून घेण्यासाठी तुम्ही पुस्तक विकत घेऊ शकता, असे आवाहन ईसमादच्या कुमूदसिंह आणि सहकारी यांनी केले आहे.india news

• ग्रंथ : मांसौषधि. (मांसाहार के आयुर्वेद – संदर्भ)

• लेखक : सत्येंद्र पीएस.

ग्रंथ विकत घेऊन वाचा 

पोथी घर – 9990111455.

• दिनकर पुस्तकालय – 9939737304.

esamaadprakashan.com – 8084566672.

• or connect with us at – 8084566672.

available onamazonindia news

हे हि वाचा : द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर

 

 

social

social: ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबांची 59 वी पुण्यतिथी 14 जानेवारीला

राजेंद्र देवढे । विशेष प्रतिनिधी | १२ जानेवारी

(social) विसाव्या शतकातील महान संत वैकुंठवासी ह.भ.प. श्री भगवानबाबा यांची ५९ वी पुण्यतिथी यावर्षी मंगळवार ता.१४ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होत आहे.social

(social) याविषयी सविस्तर माहिती अशी की, बीड आणि अहिल्यानगरच्या सीमेवर असलेल्या श्री क्षेत्र भगवानगडाचे संस्थापक आणि पहिले महंत ऐश्वर्यसंपन्न संत श्री भगवानबाबा यांची ५९ वी पुण्यतिथी यावर्षी १४ जानेवारी रोजी येत आहे. गडाच्या परंपरेनुसार संत भगवानबाबांच्या समाधीचा महाभिषेक सकाळी होणार. त्यानंतर दुपारी १२ ते २ या वेळेत श्री क्षेत्र भगवानगडाचे विद्यमान महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांचे हरिकीर्तन होईल. आलेल्या समस्त भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार आहे. पुण्यतिथी सोहळ्यासाठी संत भगवानबाबांचे देशभरातील भाविकभक्त बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. श्री क्षेत्र भगवानगडावर संत भगवानबाबा यांचे स्वप्न असणारे, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे भव्यदिव्य मंदिर महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू आहे.

(social) भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन आणि माऊली मंदिराचे काम डोळे भरून पाहण्यासाठी भाविकभक्त लांबून येत असतात. आलेल्या भाविकांच्या दर्शनाची आणि महाप्रसादाची चोख व्यवस्था महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली गडाचे विश्वस्त मंडळ आणि पंचक्रोशीतील भाविक यांच्या सहभागातून करण्यात येते. दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. दिवसेंदिवस भगवानगडावर येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.
(social) महंत नामदेव महाराज शास्त्री यांची ख्याती महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात ज्ञानेश्वरी भावकथेमुळे पोहोचली आहे. आनंदाचे सिद्धांत सोशल मीडियात प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळे पुण्यतिथीला महंत नामदेव शास्त्री महाराज यांचे अमृततुल्य कीर्तन प्रत्यक्ष ऐकण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी भगवानगडावर होत असते. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, अधिकारी आणि भाविक भक्त भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भगवानगडावर येतात. भाविकांनी यावर्षी देखील शिस्तीत संत भगवानबाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री आणि विश्वस्त मंडळाने केले आहे.

यावर्षीच्या पुण्यतिथी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे सन्माननीय न्यायमूर्ती गोविंदराव सानप हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी श्री क्षेत्र भगवानगडाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.

संबंधित बातमी epaper Rayat Samachar येथे वाचा 

हे हि वाचा :  श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

social: अंजनाबाई चव्हाण स्मृतीप्रित्यर्थ 5 झाडे लावून ‘फळझाडे लागवडीसह संवर्धनाचा निर्धार’

अहमदनगर | १० डिसेंबर | प्रतिनिधी

(social) आत्मनिर्धार स्वयंसहाय्यता बचतगटाच्या ज्येष्ठ सदस्या अंजनाबाई भागवत चव्हाण यांचे वृद्धापकाळाने बुधवारी ता.१ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी आज शुक्रवारी ता. १० रोजी  इसळक येथे पार पडला. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य निवर्तल्यामुळे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ फळझाडे लावून आणि  झाडांच्या संवर्धनाचा निर्धार करून कृतिशील श्रद्धांजली अर्पण करण्याचा नवा पायंडा चव्हाण कुटुंबीयांनी पाडला. हा उपक्रम समाजाला दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन ह.भ.प. सिद्धिनाथ मेटे महाराज यांनी केले. चव्हाण यांच्या दशक्रियाविधीच्या प्रवचनसेवेत ते बोलत होते.

(social) आत्मनिर्धार फाउंडेशन संचालित पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने आगामी काळात फळझाडे, औषधी वनस्पतींची लागवड आणि संवर्धन करण्याचा उपक्रम हाती घेतला असून त्या उपक्रमाचा शुभारंभ यानिमित्ताने करण्यात आला. इसळक येथील चव्हाण कुटुंबियांच्या मदतीने या उपक्रमास चालना मिळाली असल्याची माहिती आत्मनिर्धार फाउंडेशनचे महादेव गवळी यांनी दिली.

झाडांची लागवड आणि संवर्धन ही लोकचळवळ व्हावी, त्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक रामदास कोतकर यांनी केले.

(social) यावेळी निंबळक सोसायटीचे चेअरमन भाऊराव गायकवाड, लेखक सचिन चोभे, बाळासाहेब खपके, घनश्याम म्हस्के, पोपटराव गाडगे, संजय म्हस्के आदी मान्यवर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नातेवाईक परिवार उपस्थित होता.
पर्यावरण संवर्धन समितीचे संदीप गेरंगे, ॲड. राहुल ठाणगे, आसाराम लोंढे, राजेंद्र खुंटाळे महेश चव्हाण, विकास चव्हाण, रोहित चव्हाण आदींनी परिश्रम घेतल्याने हा उपक्रम यशस्वी झाला.
social
आत्मनिर्धार स्वयंसहाय्यता बचतगटाच्या ज्येष्ठ सदस्या दिवंगत अंजनाबाई भागवत चव्हाण
अंजनाबाई यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मृती चिरकाल स्मरणात राहाव्यात, त्यांनी दिलेल्या परोपकाराची शिकवणीचे अनुकरण करताना चव्हाण कुटुंबीयांनी श्री क्षेत्र लिंगतीर्थ इसळक येथे ५ झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्यासाठी झाडांचे पालकत्व घेण्याचा निर्णय घेतला, असल्याची माहिती किरण चव्हाण यांनी दिली. दशक्रिया विधी दरम्यान उपस्थितांच्या हस्ते पेरू, आवळा, चिंच, उंबर, पिंपळ आणि जांभुळाच्या रोपांचे रोपण करण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

 

हे हि वाचा :  द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर