Mumbai News: राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी – शरद पवार; सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा

70 / 100 SEO Score

मुंबई | १२ ऑक्टोबर | प्रतिनिधी

Mumbai News अजित पवार गटाचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. यावर भाष्य करताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शरद पवार म्हणाले, राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

ते पुढे म्हणाले, याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : human: जातीसंस्थेच्या वास्तवाचा शोध : ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टीम; जातीअंताच्या चळवळीला दिशा देणारा संजय सोनवणी यांचा ग्रंथ
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *