India News | मुख्यमंत्र्यांच्या युट्यूब चॅनेलवरून 'भारतीय कम्युनिस्ट पक्ष'बद्दल दिशाभूलीची माहिती; सीपीआयने केली 'माफी'ची मागणी - Rayat Samachar

India news | मुख्यमंत्र्यांच्या युट्यूब चॅनेलवरून ‘भारतीय कम्युनिस्ट पक्ष’बद्दल दिशाभूलीची माहिती; सीपीआयने केली ‘माफी’ची मागणी

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ
Highlights

    मुंबई | १३ जुलै | प्रतिनिधी

    (India news) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैयक्तिक यु ट्यूब चॅनेलवर ‘भारतीय कम्युनिस्ट पक्ष’ (CPI) वर बंदी असल्याचे चुकीचे व दिशाभूल करणारे वृत्त प्रसिद्ध करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलने तीव्र निषेध नोंदवत, संबंधित चॅनेलने माफी मागण्याची मागणी केली आहे.

     

    (India news) राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, फडणवीस यांनी विधानसभेत ‘भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी)’ या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा उल्लेख केला होता. मात्र त्यांच्या वैयक्तिक चॅनेलवर ‘भारतीय कम्युनिस्ट पक्ष’ वर बंदी असल्याचे भ्रामक थंबनेल व मथळे वापरून बातमी प्रकाशित करण्यात आली. यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली असून समाजात संभ्रम आणि दहशतीचे वातावरण निर्माण होण्याचा धोका आहे.

     

    - Advertisement -
    (India news) पत्रात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ‘विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४’ चा तीव्र विरोध नोंदवला असून हा कायदा लोकशाहीविरोधी असून श्रमिक, महिला, आदिवासी, युवक, विद्यार्थी यांना लक्ष्य करणारा असल्याचे म्हटले आहे. CPI च्या भूमिकेप्रमाणे हा कायदा डाव्या विचारधारेसह विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे.

     

    पक्षाने आपल्या १०० वर्षांच्या संघर्षमय इतिहासाचा उल्लेख करत भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची आठवण करून दिली आहे. गोविंद पानसरे यांच्यासारख्या नेत्यांच्या बलिदानाचा उल्लेख करत, पक्ष कोणत्याही दबावासमोर झुकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
    पत्रात म्हटले आहे की, भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अमूल्य योगदान दिलेला पक्ष आहे. २०२५ हे या पक्षाचे शताब्दी वर्ष असून, १०० वर्षात भारतीय जनतेवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पक्षाने केले आहे. भारतीय जनतेच्या अनेक न्याय मागण्यांसाठी प्रदीर्घ संघर्ष करत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत प्रसंगी आपल्या प्राणांची आहुतीही दिली आहे.
    माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल यांच्या मंत्रिमंडळात पक्षाचे नेते कॉ. इंद्रजित गुप्ता देशाचे गृहमंत्री आणि कॉ. चतुरानन मिश्रा कृषीमंत्री होते. पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर यांच्यासह पक्षाचे अन्य नेते संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेते होते. कॉ. व्ही. डी. देशपांडे आणि कॉ. माधवराव गायकवाड हे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते राहिले आहेत.
    भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या अनेक माजी आमदारांनी महाराष्ट्र विधीमंडळात गौरवशाली कामे केलेली आहेत. विधीमंडळाची प्रतिष्ठा उंचावर नेलेली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर कडव्या सनातनी उजव्या शक्तींनी हल्ला करून त्यांचा खून केला. त्यांचे हे बलिदान भारतीय कम्युनिस्ट पक्ष कधीच विसरू शकत नाही.
    हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता


    Discover more from Rayat Samachar

    Subscribe to get the latest posts sent to your email.

    Leave a comment

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Discover more from Rayat Samachar

    Subscribe now to keep reading and get access to the full archive.

    Continue reading