छत्रपती संभाजीनगर | २९ जानेवारी | प्रतिनिधी
(history) निवडणूकांसह राजकीय हितसमोर ठेवून केलेल्या ऐतिहासिक वैभवशाली अहमदनगर शहराच्या नामांतर विरोधात जगप्रसिद्ध इतिहासतज्ञ डॉ. पुष्कर सोहनी, माजी कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे आणि आर्कि. अर्शद शेख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली.
या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सरकार, महानगरपालिका आयुक्त यांच्यासह संबंधितांना म्हणणे सादर करण्यासाठी नोटिसा बजावण्याचा आदेश दिला. याविषयीची पुढील सुनावणी चार आठवड्यांनी होणार आहे.
हे हि वाचा : द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.