पुणे | ०२ ऑगस्ट | प्रतिनिधी
(Cultural Politics) Rti माहिती अधिकारातून उघड झालेल्या धक्कादायक माहितीनुसार, केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार तिरंग्यासोबत भारताच्या अधिकृत राजचिन्हाचा (राजमुद्रा) वापर न करता, धार्मिक प्रतीक असलेल्या ‘सेंगोल’चा वापर करण्यात यावा, असे आदेश दिल्लीतूनच देण्यात आले होते. ही माहिती सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी सांगितली.
(Cultural Politics) अधिक माहिती देताना चौधरी म्हणाले, राजचिन्ह बदललं आहे का या प्रश्नावर सरकारकडून स्पष्ट उत्तर देण्याचं टाळलं जातं आहे. पण ज्या पद्धतीने ‘सेंगोल’ला अधिकृत आदेशातून प्रतिष्ठित केलं जातंय, त्यातून हेच स्पष्ट होतं की राजचिन्हाला पर्याय म्हणून ‘सेंगोल’ आणलं गेलं आहे.
(Cultural Politics) ते पुढे म्हणाले, हेच ते लोक आहेत जे ‘घटना बदलणार’ हा फेक नॅरेटिव्ह आहे असं सांगत होते. मात्र सध्याच्या कृतीतून संविधानाच्या प्रतीकात्मक बदलांचा पहिला टप्पा सुरू झालेला दिसतो.
