Font ResizerAa
Rayat SamacharRayat Samachar
Search
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Rayat Samachar > अध्यात्म > Politics | शनिशिंगणापूर विश्वस्त मंडळ बरखास्त; जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्पुरती धुरा, शिर्डीप्रमाणे शासनाचा कारभार
अध्यात्मअहमदनगरआर्थिककायदाजिल्हाजिल्हाधिकारीदेशसांस्कृतिक राजकारण

Politics | शनिशिंगणापूर विश्वस्त मंडळ बरखास्त; जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्पुरती धुरा, शिर्डीप्रमाणे शासनाचा कारभार

रयत समाचार वृत्तसेवा
Last updated: 22.09.2025 9:27 pm
रयत समाचार वृत्तसेवा
Share
SHARE

अहमदनगर | २२ सप्टेंबर | रयत समाचार 

(Politics) प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानाच्या कारभारात ऐतिहासिक बदल घडला आहे. शासनाने विद्यमान विश्वस्त मंडळ बरखास्त करून, प्रशासक म्हणून अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती केली आहे. शिर्डीच्या साईबाबा संस्थानप्रमाणे हे देवस्थान सरकारच्या अख्त्यारीत आणण्यासाठी २०१८ मध्ये करण्यात आलेला कायदा आजपासून अमलात आला असून, यासंदर्भातील शासननिर्णय जारी करण्यात आला.

 

(Politics) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात या निर्णयाची घोषणा केली होती. शासन व्यवस्थापनाखाली आल्यानंतर देवस्थानातील कारभार अधिक पारदर्शक व भाविकाभिमुख होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. लवकरच नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती सरकारकडून करण्यात येणार आहे.

 

(Politics) दरम्यान, शिर्डी संस्थानप्रमाणे शासन कारभार हाती घेतल्याने देवस्थानातील कर्मचारी कामगारांचे कायदेशिर हक्क मिळतील, नाशिक वणी देवस्थानप्रमाणे कर्मचारी नियम लागू होतील, धार्मिक कार्यांचा दर्जा उंचावेल, भाविकांसाठी सुविधांचा विस्तार होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. शिर्डीप्रमाणेच भाविकांसाठी निवास, भोजनालय, डिजिटल सेवा आणि विकास प्रकल्प हाती घेतले जातील, अशीही शक्यता आहे.

 

मात्र, जुन्या विश्वस्त मंडळातील काही सदस्यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. भाविकांच्या देणग्यांवर आणि धार्मिक परंपरांवर शासनाचे नियंत्रण येणे योग्य नाही, असे काही माजी विश्वस्तांनी सांगितले. दुसरीकडे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले असून, भाविकांचा पैसा आणि सुविधांचा योग्य उपयोग होणार, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

 

शनिशिंगणापूर हे देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून, दर शनिवारी येथे प्रचंड गर्दी उसळते. शासन कारभाराखाली आल्यानंतर येथील विकास प्रकल्पांना नवी गती मिळेल, असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे.

TAGGED:politicsनेवासाशनिशिंगणापूर
Share This Article
Twitter Email Copy Link Print
Previous Article Women | स्मिता पाटील : सत्य शोधणाऱ्या कलाकार
Next Article Literature | मराठी प्रकाशक संघाची वार्षिक सभा संपन्न; महत्त्वाचे प्रश्न व उपक्रमांना मिळणार नवे बळ
BREAKING ताज्या बातम्या येथे आपोआप स्क्रोल होतील...

You Might Also Like

BreakingLatestकलाताज्या बातम्यामहाराष्ट्रमहिलासांस्कृतिक राजकारण

Culture | भारतीय संगीताचा शेवटचा स्वर हरपला; राज ठाकरे यांची आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestअहमदनगरआरोग्यताज्या बातम्याशिक्षणसामाजिक

Social | नेत्र तपासणी, मोतीबिंदू शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; समता फाउंडेशन, एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, सीएसआरडी आणि आगडगावचा संयुक्त उपक्रम

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestताज्या बातम्यामहाराष्ट्रमहिलाराष्ट्रीयसांस्कृतिक राजकारणसाहित्य

Literature | संकटाच्या काळात साहित्यच देतो आधार- रश्मी शुक्ला; ‘ग्रंथदिंडी’ने महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलनाचा दिमाखदार प्रारंभ

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestअहमदनगरआवाहनइतिहासकायदाजिल्हा पोलिस अधीक्षकजिल्हाधिकारीताज्या बातम्यासांस्कृतिक राजकारण

Public issue | वैभवशाली माळीवाडा वेस वाचविण्यासाठी पुरातत्त्व विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; ‘भावी पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवण्याची’ जबाबदारी

By रयत समाचार वृत्तसेवा
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?