मुंबई | प्रतिनिधी | २५.६.२०२४
पीककर्ज देताना शेतकऱ्यांना सिबिल स्कोर मागाल, तर बँकेविरुद्ध एफआयआर दाखल करू; महायुतीची शेतकरीहिताची भूमिका योग्य. महायुती सरकार व राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या (S.L.B.C.) बैठकीत शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना राष्ट्रीयकृत बँकांना सिबिल स्कोरची अट लावता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश महायुती सरकारने दिले आहेत.
या सोबतच सिबिल स्कोरची मागणी केल्यास संबंधित बँकेविरुद्ध FIR करणार असल्याचा थेट इशारा राज्य सरकारतर्फे देण्यात आला आहे. शेतकरी बांधवांना हा दिलासा दिल्याबद्दल महायुती सरकारचे आभार मानण्यात येत आहेत.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



