Latest news | औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना ‘आयुष्यमान भारत योजने’तून ‘आरोग्याच्या सेवा’ उपलब्ध करुन द्याव्यात- डॉ. पंकज आशिया; ‘उद्योग मित्र’ समिती बैठक संपन्न
उद्योजकांच्या अडचणी समन्वयातून वेळेत सोडविण्याचे निर्देश
सत्यमेव जयते
- Dr.Pankaj Ashiya
(Latest news) औद्योगिक क्षेत्रामध्ये उद्योजकांना वीज, रस्ते, पाणी यासह इतर मुलभूत सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्याबरोबरच उद्योजकांच्या अडचणी समन्वयातून वेळेत सोडविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत डॉ. आशिया बोलत होते.
(Latest news) बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी आशिष नवले, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप, उद्योग अधिकारी अशोक बेनके, बालाजी बिराजदार यांच्यासह उद्योग मित्र संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a comment


