India news | मीडिया गैरजबाबदारीमुळे राष्ट्रीय ऐक्याला धोका! सीपीआयचा आरोप; माहिती व प्रसारण मंत्र्यांना तातडीची कारवाई करण्याची मागणी

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते
  • Cpi demand

नवी दिल्ली | ९ मे | प्रतिनिधी

(India news) देशातील काही खासगी वृत्तवाहिन्यांच्या बेजबाबदार रिपोर्टिंगमुळे समाजात द्वेष वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला धोका पोहोचू शकतो, असा गंभीर इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (सीपीआय) दिला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आलेल्या कथित रिपोर्ट्सवरून हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

(India news) सीपीआयचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. राजा यांनी माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठवलेल्या पत्रात या बाबी अधोरेखित केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, “आपण दहशतवादाविरोधात एकत्र उभे असताना, काही वृत्तवाहिन्या समाजात द्वेष पसरवणाऱ्या, अप्रमाणित आणि सनसनाटी गोष्टी सादर करत आहेत. यामुळे देशात युद्धजन्य वातावरण निर्माण होत आहे.”

(India news) सरकारी माध्यमांचीही जबाबदारी : सीपीआयने केवळ खासगी माध्यमांवरच नव्हे, तर आकाशवाणी आणि दूरदर्शनसारख्या सार्वजनिक प्रसारमाध्यमांवरही अशा गैरजबाबदार कव्हरेजसाठी टीका केली आहे. लष्करालाही अशा चुकीच्या बातम्यांचा प्रतिवाद करण्याची वेळ वारंवार येत असल्याचे पक्षाने स्पष्ट केले.
उत्तरदायी पत्रकारितेला गप्प करण्याचा प्रयत्न?
डी. राजा यांनी पत्रात TheWire.in या उत्तरदायी डिजिटल पोर्टलवर आलेली बंदीही नमूद केली आहे. त्यांनी या कृतीला माहिती दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.
 सीपीआयच्या मागण्या : समाजात द्वेष पसरवणाऱ्या वृत्तवाहिन्यांवर त्वरित कारवाई. अप्रमाणित बातम्यांवर निर्बंध. सरकारी माध्यमांची अधिक जबाबदारी निश्चित करणे. संरक्षण, गृह आणि परराष्ट्र मंत्रालयांसोबत समन्वय साधून नियमित पत्रकार परिषदांचे आयोजन. उत्तरदायी पत्रकारितेला गप्प करू नये.
    डी. राजा यांच्या म्हणण्यानुसार, “सत्य हे युद्धातील पहिलं बळी असते.” त्यामुळेच मीडिया गैरजबाबदारीविरुद्ध सरकारने तात्काळ पावले उचलावीत, असे त्यांचे आवाहन आहे.
India news
डि.राजा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *