Font ResizerAa
Rayat SamacharRayat Samachar
Search
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Rayat Samachar > अहमदनगर > CM youth Scheme : खाजगी आस्थापना, उद्योजकाकडे १०%, सेवाक्षेत्रासाठी तर २०% उमेदवार प्रशिक्षणासाठी घेता येणार – सिद्धाराम सालीमठ; मु.यु.का.प्र. योजना
अहमदनगरमहाराष्ट्रराजकारण

CM youth Scheme : खाजगी आस्थापना, उद्योजकाकडे १०%, सेवाक्षेत्रासाठी तर २०% उमेदवार प्रशिक्षणासाठी घेता येणार – सिद्धाराम सालीमठ; मु.यु.का.प्र. योजना

रयत समाचार वृत्तसेवा
Last updated: 17.07.2024 10:33 am
रयत समाचार वृत्तसेवा
Share
CM youth Scheme https://rayatsamachar.com/archives/6101https://rayatsamachar.com/archives/6101
SHARE

अहमदनगर | प्रतिनिधी

CM youth Scheme Maharashtra राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना CM youth Scheme सुरु केली आहे. या योजनेंतर्गत Ahmednagar जिल्ह्यातील अधिकाधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देत योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन जिल्हा अग्रेसर राहील यादृष्टीने सर्व विभागांनी एकत्रित व समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ Collector यांनी दिले.

https://rayatsamachar.com/archives/6101

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात योजनेच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक संचालक निशांत सुर्यवंशी यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी, विविध कंपन्या, जिल्ह्यातील औद्योगिक संघटना, खासगी आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, या उपक्रमांतर्गत तयार केलेल्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातुन Employment रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करुन देणारे उद्योजक जोडले जातील. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातुन मिळुन त्यांची क्षमतावाढ होईल. तसेच उद्योजकांना त्यांच्या Industry उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ या माध्यमातुन मिळणार आहे. १८ ते ३५ वर्षे वय असलेल्या युवकांना योजनेमध्ये सहभागी होता येणार असुन या योजनेंतर्गत १२ वी पास असणाऱ्या युवकांना ६ हजार रुपये, आय.टी.आय अथवा पदविका धारकांना ८ हजार रुपये तर पदवीधर, पदव्युत्तर युवकांना १० हजार रुपये शासनाकडुन डीबीटीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये विद्यावेतन Staypend सहा महिन्यांसाठी देण्यात येणार असुन अतिरिक्त विद्यावेतन देण्यास आस्थापनांना मुभा राहणार आहे.

योजनेंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना-उद्योजकाकडे एकुण कार्यरत मनुष्यबळाच्या १० टक्के व सेवा क्षेत्रासाठी २० टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येणार असल्याचेही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सहकारी साखर कारखाने, दुध डेअरी, सहकारी सोसायटी तसेच विविध लघु व मध्यम उद्योग, विविध बँका, शासकीय, निमशासकीय आस्थापना आहेत. या आस्थापनांना सातत्याने कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासते. या सर्व आस्थापनांसोबत एकत्रित बैठक घेण्यात येऊन त्यांच्याकडुन त्यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची माहिती एकत्रित करण्यात येऊन मागणीनुसार युवकांना रोजगारच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिले.
बैठकीत विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींनी योजनेच्या अंमलबजावणीसाठी उपयुक्त अशा सुचना केल्या.

हे ही वाचा : Ashadhi Ekadashi: किडस् सेकंड होम स्कुलच्या वतीने आषाढी एकादशी साजरी

TAGGED:CM youth Schemeऔद्योगिककामगारकुशल मनुष्यबळजिल्हाधिकारीबेरोजगारमुख्यमंत्री
Share This Article
Twitter Email Copy Link Print
Previous Article Ashadhi Ekadashi: श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचा रंगला दिंडीसोहळा
Next Article MIM:१२ जागा लढण्याची एमआयएमची तयारी – डॉ. परवेज अशरफी; खा.ओवेसी यांनी दिले विधानसभेसाठी कामाला लागण्याचे आदेश
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

BREAKING ताज्या बातम्या येथे आपोआप स्क्रोल होतील...

You Might Also Like

BreakingLatestकलाताज्या बातम्यामहाराष्ट्रमहिलासांस्कृतिक राजकारण

Culture | भारतीय संगीताचा शेवटचा स्वर हरपला; राज ठाकरे यांची आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestअहमदनगरआरोग्यताज्या बातम्याशिक्षणसामाजिक

Social | नेत्र तपासणी, मोतीबिंदू शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; समता फाउंडेशन, एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, सीएसआरडी आणि आगडगावचा संयुक्त उपक्रम

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestताज्या बातम्यामहाराष्ट्रमहिलाराष्ट्रीयसांस्कृतिक राजकारणसाहित्य

Literature | संकटाच्या काळात साहित्यच देतो आधार- रश्मी शुक्ला; ‘ग्रंथदिंडी’ने महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलनाचा दिमाखदार प्रारंभ

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestअहमदनगरआवाहनइतिहासकायदाजिल्हा पोलिस अधीक्षकजिल्हाधिकारीताज्या बातम्यासांस्कृतिक राजकारण

Public issue | वैभवशाली माळीवाडा वेस वाचविण्यासाठी पुरातत्त्व विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; ‘भावी पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवण्याची’ जबाबदारी

By रयत समाचार वृत्तसेवा
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?