Font ResizerAa
Rayat SamacharRayat Samachar
Search
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Rayat Samachar > आंतरराष्ट्रीय > भारताचा विजयी ‘चौकार’, अफगाणिस्तान पराभूत, सुपर-८ मध्ये भारताची विजयी सुरुवात
आंतरराष्ट्रीयक्रीडामहाराष्ट्र

भारताचा विजयी ‘चौकार’, अफगाणिस्तान पराभूत, सुपर-८ मध्ये भारताची विजयी सुरुवात

रयत समाचार वृत्तसेवा
Last updated: 21.06.2024 9:10 am
रयत समाचार वृत्तसेवा
Share
SHARE

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) २१.६.२०२४

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने टी२० विश्वचषकात सलग चौथा विजय नोंदवला. भारताने अफगाणिस्तानचा ४७ धावांनी पराभव करत सुपर-८ टप्प्यातील गट-१ मधील पहिला सामना जिंकला. भारताने प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात १८१ धावा केल्या. प्रत्युत्तरात बुमराह आणि अर्शदीपने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या, ज्याच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानला २० षटकांत १३४ धावांत गुंडाळले. अफगाणिस्तानकडून अजमतुल्ला उमरझाईने २० चेंडूंत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने सर्वाधिक २६ धावा केल्या.

या सामन्यातही भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली आणि धावसंख्या राखण्यात ते यशस्वी ठरले. आता भारताचा सामना शनिवारी बांगलादेशशी होणार आहे. सुपर-८ मधील गट-१ मध्ये भारत २ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे, लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही आणि संघ ठराविक अंतराने विकेट गमावत राहिला. डिसेंबर २०२३ पासून भारताने टी२० मध्ये सलग ८ सामने जिंकले आहेत. यापूर्वी, भारताने जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० दरम्यान एकूण ९ सामने आणि नोव्हेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान सलग १२ सामने जिंकले होते.

सूर्यकुमारने अफगाणिस्तानविरुद्ध २८ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. या खेळीच्या जोरावर सूर्यकुमारला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. सूर्यकुमारला टी२० मध्ये हा पुरस्कार मिळण्याची ही १५ वी वेळ आहे. यासह सूर्यकुमारने टी२० मध्ये हा पुरस्कार सर्वाधिक वेळा जिंकणार्‍या विराट कोहलीची बरोबरी केली आहे.

अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी या सामन्यात चांगली गोलंदाजी केली, पण या सामन्यात फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. प्रथम, बुमराहने अफगाणिस्तानला सुरुवातीचे धक्के दिले, तर शेवटी अर्शदीपने त्यांच्या शेवटच्या आशाही धुळीस मिळवल्या. अफगाणिस्तानने दुसऱ्याच षटकात ११ धावांवर रहमानुल्ला गुरबाजची विकेट गमावली. यानंतर संघाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. अफगाणिस्तानची धावसंख्या एकवेळ २३ धावांत तीन विकेट्स अशी होती. मात्र, गुलबदीन नायबने अजमतुल्लासह डावावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र, फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने नायबला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. नायब १७ धावा करून बाद झाला. त्यानंतर ओमरझाईला बाद करून जडेजाने अफगाणिस्तानला मोठा धक्का दिला. या टी२० विश्वचषकात कुलदीपचा प्रथमच प्लेइंग-११ मध्ये समावेश करण्यात आला आणि त्याने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला.

या विश्वचषकात भारताला आपल्या सलामीच्या जोडीकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे, पण विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा या जोडीला आतापर्यंत संघाला दमदार सुरुवात करून देता आलेली नाही. फजलहक फारुकीने रोहितला बाद करून भारताला पहिला धक्का दिला. रोहित १३ चेंडू खेळून आठ धावा करून बाद झाला. यावर्षी टी२० क्रिकेटमध्ये डावखुरा वेगवान गोलंदाजाविरुद्ध रोहित बाद होण्याची ही आठवी वेळ आहे. विक्रमांवर नजर टाकली तर १९ डावात हिटमॅनने ९८ चेंडूंचा सामना करत १२८ धावा केल्या. या कालावधीत त्याची सरासरी १६ आहे. सध्याच्या स्पर्धेत रोहितने एका अर्धशतकाच्या मदतीने ९९ धावा केल्या आहेत.

या विश्वचषकात लय शोधण्यासाठी धडपडणाऱ्या कोहलीची बॅट या सामन्यातही विशेष काही दाखवू शकली नाही. कोहलीला २४ चेंडूत केवळ २४ धावा करता आल्या. राशिद खानने त्याला आपला शिकार बनवले. कोहलीने त्याच्या मागील डावाच्या तुलनेत चांगली कामगिरी केली असली तरी त्याला फारशी छाप पाडता आली नाही. कोहलीच्या खराब फॉर्मने चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा केली. त्याच्या बॅटमधून एक षटकार वगळता एकही चौकार आला नाही. अफगाणिस्तानचा कर्णधार आणि अनुभवी फिरकी गोलंदाज राशिद खानने त्याला नवव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर आपला बळी बनवले. गेल्या १० डावांमध्ये कोहलीने २५ वर्षीय गोलंदाजाविरुद्ध ८५ चेंडूत केवळ १०८ धावा केल्या आहेत. यामध्ये तो तीन वेळा बाद झाला आहे. याआधी गेल्या तीन सामन्यांमध्ये कोहलीला केवळ पाच धावा करता आल्या होत्या.

अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा डाव फसला आणि एकेकाळी संघाची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात ९० धावा होती, पण सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या यांनी शानदार भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढले. या दोन फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने १३व्या षटकात अजमतुल्ला ओमरझाईच्या चेंडूवर २ चौकारांसह भारताचे शतक पूर्ण केले. हार्दिक पांड्यानेही नवीन आणि रशीदवर चौकार मारून आपली वृत्ती दाखवून दिली. त्याने १६व्या षटकात नूरच्या सलग चेंडूंवर एक चौकार आणि एक षटकारही ठोकला. सूर्यकुमारने पुढच्याच षटकात फारुकीच्या लागोपाठ चेंडूंवर षटकार आणि चौकार मारत अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, पण पुढच्याच चेंडूवर नबीने त्याचा झेल घेतला. या षटकात भारताच्या १५० धावाही पूर्ण झाल्या. हार्दिकने पुढच्या षटकात नवीनच्या चेंडूवर षटकार मारला पण नंतर तो ओमरझाईच्या चेंडूवर झेलबाद झाला. रवींद्र जडेजानेही सात धावा केल्यानंतर फारुकीच्या चेंडूवर गुलबदिन नायबला झेलबाद केले. डावाच्या शेवटच्या चेंडूवर धावबाद होण्यापूर्वी अक्षर पटेलने नवीनच्या षटकात दोन चौकारांसह १४ धावा केल्या, ज्याच्या मदतीने भारताला १८० धावांचा टप्पा पार करण्यात यश आले.

उद्या सकाळी ६ वाजता ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश तर रात्री ८ वाजता इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना होणार आहे.

TAGGED:cricketsportsक्रिकेटक्रीडा
Share This Article
Twitter Email Copy Link Print
Previous Article आय.एस.डी.टी. विद्यार्थ्यांचे वार्षिक प्रदर्शन, स्वानुभव : २०२४ चे २२ व २३ जुन रोजी आयोजन – विनायक देशमुख 
Next Article श्री छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये आंतराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

BREAKING ताज्या बातम्या येथे आपोआप स्क्रोल होतील...

You Might Also Like

BreakingLatestकलाताज्या बातम्यामहाराष्ट्रमहिलासांस्कृतिक राजकारण

Culture | भारतीय संगीताचा शेवटचा स्वर हरपला; राज ठाकरे यांची आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestताज्या बातम्यामहाराष्ट्रमहिलाराष्ट्रीयसांस्कृतिक राजकारणसाहित्य

Literature | संकटाच्या काळात साहित्यच देतो आधार- रश्मी शुक्ला; ‘ग्रंथदिंडी’ने महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलनाचा दिमाखदार प्रारंभ

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestअहमदनगरआवाहनइतिहासताज्या बातम्यामहाराष्ट्रमहिलाशिक्षणसांस्कृतिक राजकारण

History | फुले यांचा कन्या शिक्षण वारसा धोक्यात; भिंगारमधील ऐतिहासिक ‘महात्मा फुलेंची शाळा’ वाचविण्यासाठी जनांदोलनाची हाक

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestअहमदनगरआर्थिकआवाहनताज्या बातम्यानोकरी विषयकमहाराष्ट्रव्यापार

Business | ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना’ लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत; सुमारे 2 हजार कंपन्यांसोबत करार

By रयत समाचार वृत्तसेवा
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?