Font ResizerAa
Rayat SamacharRayat Samachar
Search
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Rayat Samachar > आंतरराष्ट्रीय > World news | भारत- नेपाळ मैत्रीचे नाते वृध्दिंगत- नेपाळी दूतावासची ग्वाही
आंतरराष्ट्रीयदेशसांस्कृतिक राजकारण

World news | भारत- नेपाळ मैत्रीचे नाते वृध्दिंगत- नेपाळी दूतावासची ग्वाही

सुसंवाद कार्यक्रम संपन्न 

रयत समाचार वृत्तसेवा
Last updated: 17.07.2025 8:34 pm
रयत समाचार वृत्तसेवा
Share
उपसंपादक | दिपक शिरसाठ
SHARE
Highlights

पणजी | १७ जुलै | प्रतिनिधी

(World news) नेपाळ आणि भारत यांच्यातील परंपरागत मैत्री व बंधूभावाचे नाते अधिक दृढ व्हावे यासाठी नवी दिल्लीतील नेपाळी दूतावास नेहमीच प्रयत्न करतो. भारतातील विविध राज्यातील तसेच गोव्यातील नेपाळी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी दूतावास नेहमीच दक्ष राहील, अशी ग्वाही नेपाळी दूतावासचे उप मुख्याधिकारी डॉ. सुरेंद्र थापा यांनी येथे केले. नेपाळी दूतावास, किन इंडिया तथा गोव्यातील विविध नेपाळी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने पणजी येथे आयोजित सुसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

(World news) यावेळी नेपाळी दूतावासचे द्वितीय सचिव उत्तम नेपुणे,यदुनाथ भट्टराय, मनोजकुमार सिंग, किन इंडियाचे संचालक नवीन जोशी, इंद्रराय भट्टराय, प्रगतीशील नेपाळी समाज भारतचे अध्यक्ष लोकेंद्र सेर्पाली, प्रकाश ओली, प्रकाश थापा, ॲड. श्रीनिवास खलप, पत्रकार प्रभाकर ढगे, शंकर किर्लपालकर आदी उपस्थित होते.

(World news) गोव्यातील नेपाळी समुदायासाठी कामगार जागरूकता हा कार्यक्रम नवी दिल्लीतील नेपाळी दूतावासाने आणि मानवी तस्करीविरुद्ध लढण्यासाठी सक्रिय असलेल्या किन इंडिया दिल्लीच्या सहकार्याने आयोजित केला होता. भारतातील नेपाळी कामगारांना भारतीय कामगार कायद्यांबद्दल माहिती देणे आणि त्यांना संवेदनशील करणे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
  नेपाळी दूतावासचे द्वितीय सचिव उत्तम नेपुणे, यदुनाथ भट्टराय म्हणाले, नेपाळी समुदायाला सुरक्षित स्थलांतराबद्दल जागरूक असणे महत्वाचे आहे. कारण सध्या, भारतातील विविध ठिकाणी रोजगारासाठी जाणाऱ्या नेपाळी कामगारांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आणि काही नेपाळी लोक मानवी तस्करी आणि तस्करीला बळी पडत असल्याचे आढळून आले आहे. अशा जागरूकता कार्यक्रमांमुळे खूप मदत होईल अशी अपेक्षा आहे.
या कार्यक्रमात ॲड. श्रीनिवास खलप यांनी नेपाळी नागरिकांना मोफत कायदा सल्ला उपलब्ध करण्याची तयारी दर्शवली. पत्रकार प्रभाकर ढगे यांनी नेपाळी दूतावासाने देशभरातील नेपाळी नागरिकांच्या हिताची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक लोकेंद्र सेर्पाली यांनी तर डॉ. सुरेंद्र थापा यांनी आभार मानले.

World news

हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता

TAGGED:Goa NewsWorld newsगोवानेपाळप्रभाकर ढगे
Share This Article
Twitter Email Copy Link Print
Previous Article Education | अहिल्यानगर जिल्हा आता पुणे विभागीय केंद्रांतर्गत; यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा ऐतिहासिक निर्णय
Next Article Art | राजेश खन्ना | काकाजींचे पुण्यस्मरण; डॉ. राजीव सूर्यवंशी यांचा ‘चित्रसंवाद’ वाचा
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

BREAKING ताज्या बातम्या येथे आपोआप स्क्रोल होतील...

You Might Also Like

BreakingLatestकलाताज्या बातम्यामहाराष्ट्रमहिलासांस्कृतिक राजकारण

Culture | भारतीय संगीताचा शेवटचा स्वर हरपला; राज ठाकरे यांची आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestताज्या बातम्यामहाराष्ट्रमहिलाराष्ट्रीयसांस्कृतिक राजकारणसाहित्य

Literature | संकटाच्या काळात साहित्यच देतो आधार- रश्मी शुक्ला; ‘ग्रंथदिंडी’ने महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलनाचा दिमाखदार प्रारंभ

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestअहमदनगरआवाहनइतिहासकायदाजिल्हा पोलिस अधीक्षकजिल्हाधिकारीताज्या बातम्यासांस्कृतिक राजकारण

Public issue | वैभवशाली माळीवाडा वेस वाचविण्यासाठी पुरातत्त्व विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; ‘भावी पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवण्याची’ जबाबदारी

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestअहमदनगरआवाहनइतिहासताज्या बातम्यामहाराष्ट्रमहिलाशिक्षणसांस्कृतिक राजकारण

History | फुले यांचा कन्या शिक्षण वारसा धोक्यात; भिंगारमधील ऐतिहासिक ‘महात्मा फुलेंची शाळा’ वाचविण्यासाठी जनांदोलनाची हाक

By रयत समाचार वृत्तसेवा
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?