Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’

'खोपडे पॅटर्न' : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ
Highlights
  • KHOPADE PATTERN, BHIWANDI PATTERN

समाजसंवाद | १७ मे | सुरेश खोपडे

(Social) आजही ‘मिनी पाकिस्तान’ म्हणून ओळखले जाणारे भिवंडी शहर शांत राहते, हे फक्त पोलिस बंदोबस्तामुळे नव्हे, तर एका नाविन्यपूर्ण प्रशासनिक प्रयोगामुळे शक्य झाले. हा प्रयोग म्हणजेच ‘भिवंडी मॉडेल’ किंवा ‘खोपडे पॅटर्न’.

(Social) हा प्रयोग यशस्वी झाला, तर भारत-पाकिस्तान वादासारख्या दीर्घकाळ चाललेल्या संघर्षांवरही नवीन दिशा मिळू शकते का? हो, नक्कीच!

(Social) संघर्षाचा मार्ग बदलवण्याचा प्रयत्न : हिंदू-मुस्लिम संघर्ष, पाकिस्तानबरोबरचा तणाव किंवा दहशतवादाचे प्रश्न. या सर्वांसाठी युद्ध हा मार्ग नाही. दहशतवाद्यांवर थेट कारवाई करताना अनेकदा निरपराध लोक बळी जातात. यामुळे द्वेषाची वाईट चक्रव्यूह अधिक खोलवर रुजतो.
त्यासाठी आवश्यक आहे अंतर्गत सुरक्षा मजबूत करणे आणि सामाजिक संवादाचे प्लॅटफॉर्म निर्माण करणे. हे शक्य आहे का? होय. आम्ही हे भिवंडी शहरात १९८८ ते १९९२ दरम्यान यशस्वीपणे केले.
‘भिवंडी मॉडेल’ची मूलतत्त्वे : मोहल्ला/गाव/वार्ड स्तरावर युनिट तयार करणे. लोकप्रतिनिधी, नोकरशहा, नागरिक यांचा सहभाग असलेली कमिटी स्थापन करणे. प्रत्येक सरकारी कार्यालयात ‘काम सुधार मंडळ’ स्थापन करणे. सर्जनशीलतेला वाव देणारे नवोपक्रम राबविणे.
या व्यूहरचनेमुळे लोकांना समाधानकारक संवाद आणि भागीदारीची संधी मिळाली. याचा थेट परिणाम म्हणजे १९९२ मध्ये देशभर दंगल सुरू असताना भिवंडी शांत राहिले.
जागतिक मंचावर ‘खोपडे पॅटर्न’ : चीनसारख्या देशातही सामाजिक संघर्ष प्रचंड वाढले होते. २०१० मध्ये चीनमध्ये भरलेल्या जागतिक परिषदेत मला आमंत्रित केले गेले. त्यात मी सादर केलेले ‘भिवंडी मॉडेल’ सर्वोत्कृष्ट ठरले. हे मॉडेल भारतभर आणि काश्मीरसारख्या ठिकाणी का वापरले जाऊ शकत नाही?
अनेकांना हे हास्यास्पद वाटेल, परंतु नाविन्यपूर्ण प्रयोगच सामाजिक तणाव मिटवू शकतात.
शेवटी…सामाजिक संघर्ष मिटवण्यासाठी शस्त्रपेक्षा संवाद आणि नवोपक्रम अधिक परिणामकारक ठरतात. ‘भिवंडी मॉडेल’ म्हणजे या दृष्टिकोनाची जिवंत उदाहरण आहे. यावर आपण अधिक सविस्तर बोलूच.
Social
सुरेश खोपडे, निवृत्त वरीष्ठ पोलिस अधिकारी

हे ही वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
5 Comments

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading