मुंबई | प्रतिनिधी | २८
आयुष्यात कठीण परिस्थितीत मध्यममार्ग साधता आला पाहिजे. मी तसाच प्रयत्न करतो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सर्वांनी तसा प्रयत्न करावा, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितिन करीर यांनी त्यांच्या निरोप समारंभात सत्काराला उत्तर देताना केले.
मुख्य सचिव डॉ. करीर ता. ३० जून २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



