मुंबई (प्रतिनिधी) १३.६.२४
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप ठरलेले नाही. मी कोणाकडे जागा मागायला जाणार नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, विधानसभेला २०० ते २५० जागांवर निवडणूक लढण्याची तयारी करत आहोत. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना झालेले मतदान हे मराठी माणसाचे नाही. लोकांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी राग आहे. उद्धव ठाकरेंना झालेले मतदान हे मोदींविरोधात मतदान आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



