अहमदनगर | ११.४ | रयत समाचार
(Public issue) शहराच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या माळीवाडा वेशीच्या संरक्षणासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) पुढे सरसावले आहे. या संदर्भात अधीक्षक पुरातत्त्वविद डॉ. शिवकुमार भगत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यामधे बाळासाहेब बोराटे यांचा संदर्भ दिला आहे.
(Public issue) ऐतिहासिक वारसा धोक्यात : पत्रानुसार, माळीवाडा वेशीचे बांधकाम इ.स. १६३१ मध्ये निजामशाही सरदार सर्जेखान यांनी केले होते. ही वेस शहराच्या तटबंदीत असलेल्या अकरा ऐतिहासिक दरवाजांपैकी एक असून अहमदनगरच्या समृद्ध इतिहासाचे महत्त्वपूर्ण प्रतीक मानली जाते. तसेच माळीवाड्याचे नाक समजले जाते. माळीवाड्याची ओळख म्हणजे ही वेस असून ती स्वाभिमानाची खूण आहे.
(Public issue) अतिक्रमण हटविण्याचे आदेश : भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने यापूर्वीच २०११ मध्ये महानगरपालिकेला स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, माळीवाडा व दिल्ली दरवाजाचे नुकसान होऊ नये. तसेच या परिसरातील अतिक्रमण हटवून दरवाजांचे संवर्धन करावे, असेही नमूद करण्यात आले होते.
संवर्धनासाठी प्रस्तावाची मागणी : ताज्या पत्रात जिल्हाधिकाऱ्यांना विविध बाबींसाठी निर्देश देण्यात आलेत. माळीवाडा वेस परिसरातील अतिक्रमण तात्काळ हटविणे. वेशीचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी प्रस्ताव राज्य पुरातत्त्व विभागाकडे पाठविणे. ऐतिहासिक वास्तू ‘भावी पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवण्याची’ जबाबदारी पार पाडणे.
वारसा जपण्याची गरज : शहरातील ऐतिहासिक वास्तूंवर वाढत्या अतिक्रमणामुळे वारसा धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करून माळीवाडा वेशीचे जतन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
हे ही वाचा : महात्मा फुले समग्र वाड्मय PDF येथे उपलब्ध आहे
History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक

