By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Rayat SamacharRayat Samachar
Reading: Press | सुरेश वाळवे यांच्या निधनाने गोमंतकीय पत्रकारितेतील दिलखुलास पर्वाचा अस्त
Share
Notification Show More
Font ResizerAa
Font ResizerAa
Rayat SamacharRayat Samachar
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Rayat Samachar > देश > Press | सुरेश वाळवे यांच्या निधनाने गोमंतकीय पत्रकारितेतील दिलखुलास पर्वाचा अस्त
देशनिधनवार्ता

Press | सुरेश वाळवे यांच्या निधनाने गोमंतकीय पत्रकारितेतील दिलखुलास पर्वाचा अस्त

रयत समाचार वृत्तसेवा
Last updated: 27.10.2025 11:11 pm
By रयत समाचार वृत्तसेवा 2 Min Read
Share
उपसंपादक | दिपक शिरसाठ
SHARE

गोवा | २७.११ | प्रभाकर ढगे

(Press) दैनिक ‘नवप्रभा’ चे सिद्धहस्त संपादक सुरेश वाळवे यांच्या निधनाने गोमंतकीय मराठी पत्रकारितेतील एक दिलखुलास आणि उमदेपणाने जगलेले पर्व संपुष्टात आले.

(Press) अतिशय टापटीप राहणीमान, अचूक लेखनशैली आणि वृत्तपत्राला वाचकाभिमुख बनविण्याची हातोटी या गुणांनी वाळवे यांनी ‘नवप्रभा’ ची वृत्ती आणि प्रकृती घडविली. संपादक म्हणून ते सदैव जागरूक, संवेदनशील आणि मोकळ्या मनाचे होते.

(Press) संपादकांमध्ये परस्पर कौतुकाची परंपरा विरळच असते, मात्र सुरेश वाळवे हे त्या अपवादातील अपवाद होते. इतर संपादकांचे लेख, अग्रलेख आवडले वा न आवडले, दोन्ही प्रकारांवरही ते तत्परतेने प्रतिक्रिया द्यायचे, फोन करून मत व्यक्त करायचे.

पत्रकारितेतील मतभेदांनाही त्यांनी कधी कटुता येऊ दिली नाही. ‘भायल्यांची दादागिरी’ या त्यांच्या अग्रलेखास प्रत्युत्तर म्हणून लिहिलेल्या ‘वाळवे, तुम्हीही भायलेच’ या अग्रलेखातील टीका त्यांनी खेळकरपणे स्वीकारली आणि उलट त्या लेखकाचे कौतुक केले, हेच त्यांच्या व्यापक मनाचे प्रतीक होते.

गोव्यातील राजकीय व सामाजिक प्रश्नांवर त्यांचे आकलन नेहमीच सूक्ष्म व प्रामाणिक राहिले. “आमचा पेपर खाण मालकाचा, मी नाही लिहू शकत… पण तुम्ही लिहा बिनधास्त,” असे सांगून सत्य लेखनाला त्यांनी नेहमी प्रोत्साहन दिले.

डिचोली तालुक्यातील व्हाळशी गावातील ओहोळकिनारी वसलेले त्यांचे निवासस्थान आणि स्वतःच्या खर्चाने उभारलेला मंडप व वाचनालय, हे त्यांच्या संस्कारशील व समाजाभिमुख वृत्तीचे साक्षीदार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने वाळवे कुटुंबाला दिलेले मोडी लिपीतील आज्ञापत्र त्यांनी जपून ठेवले होते. इतिहास आणि वारसा यांचा अभिमान त्यांच्यात होता.

मराठी व कोकणी या भाषिक वादात त्यांनी नेहमी तटस्थ परंतु न्याय्य भूमिका घेतली. ते स्पष्टवक्ते, धारदार आणि लोकाभिमुख संपादक म्हणून ओळखले जात. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आपल्या अग्रलेखातून आवाज देणाऱ्या या संवेदनशील पत्रकाराची उणीव गोमंतकीय पत्रकारिता दीर्घकाळ भासेल. सुरेश वाळवे यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली.

TAGGED:pressगोवानिधनवार्ताप्रभाकर ढगेसंपादक
Share This Article
Facebook Twitter Email Print
Previous Article Election | अहिल्यानगर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 11 नोव्हेंबरला प्रभागनिहाय आरक्षण सोडत; 2 डिसेंबरनंतर केव्हाही निवडणुकीचा बिगुल
Next Article Bureaucracy | एम-सँड युनिट मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना; कृत्रिम वाळूसाठी राज्य शासनाचे नवे धोरण जाहीर
BREAKING ताज्या बातम्या येथे आपोआप स्क्रोल होतील...
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Join Us!

Subscribe to our newsletter and never miss our latest news, podcasts etc..

[mc4wp_form]
Zero spam, Unsubscribe at any time.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?