पुणे | ०४ ऑगस्ट | प्रतिनिधी
(Literature) ‘एकविसाव्या शतकारंभीचे बालसाहित्य’ या उल्लेखनीय ग्रंथासाठी साहित्यिक विठ्ठल जाधव यांना लीलावती भागवत राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
(Literature) हा सन्मान समारंभ पुण्यातील माॅडर्न महाविद्यालय येथे संपन्न झाला. यावेळी अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थाचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्यवाह अनिल कुलकर्णी, प्रसाद भडसावळे, प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव, संजय ऐलवाड, सचिन बेंडभर, बबन शिंदे आणि विनोद सिनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
(Literature) विठ्ठल जाधव यांच्या लेखनात आधुनिक युगातील बालविश्वाचे समजूतदार चित्रण आणि बालकांच्या मनोविश्वाशी सुसंवादी संवाद आढळतो. या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी बालसाहित्याच्या नव्या वाटा खुल्या केल्या असून, त्यांच्या या कार्याची राज्यस्तरीय पातळीवर दखल घेतल्याने साहित्य क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.