लोणी (प्रतिनिधी) २०.६.२०२४
अहमदनगर दक्षिणचे आरएसएस बीजेपीचे पराभूत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय निवडणूक आयोगकडे ईव्हीएम व व्हिव्हिपॅट परीकणाची मागणी केली आहे. त्यांच्या सोबत देशभरातील इतर ११ पराभूत उमेदवारांनी हि मागणी केला त्यामधे विखेंसह भाजपाचा आणखी देन उमेदवार आहेत.
यावर प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले की, जनतेने दिलेला कौल मान्य आहेच. मात्र, अनेक ठिकाणांहून कार्यकर्त्यांच्या शंका आणि तीव्र मागणी होती. त्यामुळे तेथील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट पडताळणी करण्याची मागणी नियमानुसारच निवडणूक आयोगाकडे केली आहे. यात कोणतेही राजकारण नाही. यातून कोणीही वेगळा अर्थ काढू नये.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



