फडणवीस-शिंदे-पवार सरकारने वक्फ़ मंडळासाठी १० कोटींपैकी २ कोटी निधी केला वितरित

मुंबई (प्रतिनिधी) १४.६.२०२४

महाराष्ट्रातील वक्फ़ मंडळासाठी राज्य शासनाने यावर्षी १० कोटींच्या तरतुदीतून २ कोटी निधी वितरित केला आहे. केंद्र शासनाद्वारे देशात वक्फ़ कायदा १९९५ लागू करण्यात आलेला आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य वक्फ़ मंडळाची स्थापना करण्यात आली. वक्फ़ मंडळ हे वैधानिक मंडळ असून राज्यातील वक्फ़ मालमत्ता संबंधित कामकाजाचे संनियंत्रण करण्याची जबाबदारी वक्फ़ मंडळावर आहे.

ज्याप्रमाणे राज्यांमधील धर्मादाय संस्थांचे संनियंत्रण धर्मादाय आयुक्त कार्यालयाद्वारे करण्यात येते, त्याचप्रमाणे राज्यातील वक्फ़ संस्थांचे सनियंत्रण राज्य वक्फ़ मंडळामार्फत करण्यात येते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *